पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कामगार दिन.. नव्या समस्यांच्या उंबरठ्यावर

        प्रथमता कामगार /मजुर दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा..  कामगार हा अत्यंत महत्वाचा तरीही कायम दुय्यम राहिलेला वर्ग. कामगारांचे दोन वर्ग प्रामुख्याने स्थळ ,काळ, परिस्थिती नुसार करता येतील. शहरी कामगार अन ग्रामीण भागातील कामगार. दोघांचे प्रश्न वेगळे अाहेत येवढ्या लेखात संपुर्ण खोलात जाता येणार नाही त्यामुळे फक्त स्पर्श आढावा घेण्याचा प्रयत्न राहील.     देशाची नव्हे जगाची अर्थव्यवस्था ह्या कामगार वर्गाच्या हातात आहे . त्यांच्या घामाची किंमत हीच राष्ट्राची संपत्ती.लोकशाहीर अन्नाभाऊ साठे म्हणाले होते "पृथ्वी ही शेषाच्या(शेषनाग) मस्तकावर नाही तर कामगारांच्या तळहाताच्या फोडावर तरलेली आहे" आणि हे खरच आहे. बडा बागायतदार असो की भांडवलदार, कारखानदार वर्ग असो कामगाराशिवाय हालचाल करूच शकत नाही. ग्रामीण भागातील छोटे शेतकरी, आणि शहरी भागातील छोटे उद्योग चालक हे स्वताच मालक व कामगार या भूमिकेत काम करतात. आजवर कामगारांचे अनेक लढे झाले, अनेक चळवळी आल्य.नेते आले. त्याची हजारो नावे सांगता येतील. आजच्या घडीला नवी आश्वासने पेलावी लागत आहेत.     रोजगाराचे जस...

३० मे चा अरणचा माळी समाज मेळावा, मुद्दे आणि पाठलाग

   सरकारे येतात आणि जातात, मुळ समाजकारण जिवंत राहीलं पाहिजे. आज याची सत्ता तर उद्या त्याची असेल मात्र सामाजिक भुमिकांशी पाठ फिरवुन चालत नाही. कल्याण काका आखाडे यांनी आज दि ३० एप्रिल २०२२ रोजी अरणाला ऐतिहासीक मेळावा घेतला. त्यासाठी कल्याणकाका आखाडे यांचं मनापासून अभिनंदन व आभार.      माळी समाजाचा मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आता स्वत: सरकारच या मेळाव्याला आलं म्हणले तर गैर नाही.सावता महाराजांची जीवंत समाधी अरणला अ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जाच्या प्रश्नावर तुर्तास अजित दादांनी हिरवा कंदील दिला. ४-५ तारखेला तशी बैठक होणार आहे. अरण ते पंढरपुर पालखी मार्गाचा ही विचार सरकार म्हनुण केला जाईल असेही दादा म्हणाले.आवाक्यात असणारी कामांसाठी होकार मिळाला येवढं आजच्या मेळाव्याचे यश म्हणावं.  "सावता महाराजांचे विचार महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कल्याणासाठी महत्वाचे आहेत" हा विचार मात्र अजित दादा यांनी बोलून दाखवला. माळी समाजाचे अर्थिक, सामाजिक, राजकिय प्रश्न यासाराख्या प्रश्नांना सरकारने रितसर बगल दिली.       ओबीसी ...

लोकांना नेत्याचा 'आदर' वाटायला हवा, भीती नाही

 राजकारणात वातावरण हल्ली खुप गरम आहे अशी चर्चा वरच्या स्थरात ऐकायला मिळते.पन वास्तवात राजकारणाला हल्लीच्या वातावरणाची भीती खुप कमी आहे. *राजकारणात राजा हा मतावर निवडला जातो, भाषणातल्या टाळ्यांवर नाही.* सभांमधून होणा-या भडक भाषणांनी आजवर जनतेच्या मनात 'मता'ची जागा घेतलेली दिसत नाही. सभेला *दहा हजार अन मते १ हजार* अशी अवस्था काही पक्षातील उमेदवारांची झालेली आपण पाहीली. त्यामुळे राजकारणाला भडक भाषणाची भीती नाही.        *भीती तर प्रशासनाला व जनतेला आहे.* भडकाऊ भाषणांमुळे कायदा सुव्यस्थेला धोका निर्माण होतो. शेवटी प्रशासन कमी पडल्यावर त्याचा परिणाम लोकांवर होतो. भडकलेली माथी दंगली घडवतात. ज्या बसेसने आजवर प्रवास केला त्या बसेस फुटतात. पर्यायाने तोटा सामान्य लोकांचाच होतो. भडकलेली माथी जाती, धर्म द्वेशाने पिसाळलेली असतील तर दंगली होतात पुन्हा तेच *जनतेतील एकी व सौदार्ह नष्ट होतं. नवख्या तरूणांवर गुन्हे दाखल होतात.त्यांच शिक्षण ,करियर संपून जांतं. सामाजातील द्वेशाचा परिणाम लहान मुलांवर होतो त्यातून त्यांच्यात नागरिक बनण्याची प्रक्रिया वीटाळते.* म्हणुन जनतेला अशा ...

राजकिय इच्छाशक्तीचा अभाव भरून काढण्याचे माळी समाजापुढे आव्हान

राजकिय इच्छाशक्तीची उणीव भरून काढल्याशिवाय समाजाला अस्तित्वाची जाणिव होणार नाही. समाज व्यवस्थेत हजारो वर्षे वंचित राहिलेल्या घटकाला डॉ. बाबासाहेबांनी संदेश दिला *''जा अन तुमच्या घराच्या भींतीवर लिहून ठेवा ..तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे" ..* समाजिक प्रश्नांची सोडवणुन करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात का होईन राजकिय इच्छाशक्तीची गरज पडते हे खरच आहे. कालपरवाचेच उदाहरण पाहिलं की जो विचार अमोल *मिटकरींसह हजारो पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते वर्षानुवर्षे सांगत होते तोच विचार एका राजकिय पक्षाच्या मंचावरून सांगीतल्याने त्याची सुसाट चर्चा झाली.* *राजकारणात प्राबल्य नसणे हे सामाजिक दुबळेपणाचं लक्षण आहे.* हा दुबळेपणा भरून काढण्यासाठी शिक्षणातून राजकारणाचे धडे मिळणे हे आज गरजेचं आहे. तालमीत मल्लविद्या शिकता शिकता राजकारणाची सुपारी कानात फोडावी. तशी राजकारणाची विद्या शाळा महाविद्यालयातून मिळणं गरजेचं आहे. शिक्षणात शिकवल्या गेलेल्या गोष्टीपेक्षा शिक्षण मिळवून सामाजिक प्रश्न ओळखण्याची ताकद अंगी यायला हवी. *म. फुलेंनी शिक्षण घेतल्याशिवाय बदल होणार नाही असं सांगितलं तर डॉ. बाबासाहेबांनी शि...

चळवळी, राजकारण की फक्त चिखलफेक ??

 *ह्या चळवळी की पातळी सोडलेली चिखलफेक??*       भारतातील सांस्कृतिक चळवळींचे तीन भागात विभाजन करता येईल साधारण इ. स १९०० पूर्वीचा कालखंड आणि १९०१-२००० चा कालखंड व २००१ नंतरचा कालखंड.         इ.स.१९०० च्या आधीच्या चळवळीला प्रवाहाविरूद्ध वाहण्याचा धर्म होता.त्याला एक वैचारिक बैठक होती, चळवळीचा कार्यकर्ता चळवळीचा विचार समजून घेतल्या शिवाय तोंड उघडत नव्हता. प्रचंड विरोधाला उत्तर देता यावं हा उद्देश त्यामागे होताच. या चळवळीत सहसा कार्यकर्ता मिळत नसायचा आणि एकदा का कार्यकर्त्याने चळवळीचा विचार मनावर घेतला की तो शेवट पर्यत तो विचार सोडत नव्हता. त्यावेळची प्रसारमाध्यमे म्हणजे वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिके ही मोजकीच होती पन त्यात *स्वतंत्र विचार जन्माला घालण्याची व माकडाचा माणूस बनवण्याची ताकद होती.*             इ.स१९००नंतरच्या काळात कार्यकर्ते तयार होणं हा शिक्षीत होण्याचा भाग होता. त्यामुळे तसा तुटवडा नव्हता, चळवळीचा उद्येश स्वतःच्या सोयीने घेणे सुरू झाले, पर्यायाने ढीगभर वृत्तपत्रांनी जन्म घेतला. *वृत्तपत्रात विचार होते पन चि...

राज'कारणातील धर्म नावाचा गढूळपणा जात नाही तोपर्यत मराठी झेंडा अटकेपार पोहोचणार नाही....

 राजकारणात झळकण्यासाठी धर्म हा खुप सोपा, प्रथम व सरळ मार्ग आहे ..हा फक्त झळकण्याचा मार्ग आहे यशस्वी होण्याचा नाही. ज्या ज्या सत्तांनी धर्माच्या नावाने राजकारण टोकाला नेलं त्या सत्ता संपुष्टात आल्या. धर्मांध औरंगजेब असो की धर्मांध पेशवाई असो. अंत तर ठरलेलाच होता. ज्या राजांनी सहिष्णू राज्ये केली ती टिकली हजारो वर्षे मनावर राज्य करत राहीलं. जुलमी मुगलं सत्तेला पुरून उरणारं राजा शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य मुस्लिम म्हनुन कोणावर अन्याय करत नव्हतं.. तसेच अकबराच्या राज्यात हिंदू म्हणुन कोणाचा द्वेश नव्हता.           महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा शिवरायांच्या रयतराज्याचा महाराष्ट्र आहे हे फक्त बोलुन चालणार नाही. हे राज्य टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्माचा गढूळपणा राजकारणातून अद्याप तरी हद्दपार झालेला नाही त्यामुळे ह्या महाराष्ट्रास त्यापासून वाचवणे गरजेचं आहे. धर्माच्या नावाने राजकारण करणं गैर नाही मात्र परधर्मियांचा द्वेश करून राजकारण गढुळच. मराठी झेंडे अटकेपार जात असताना मशिदींवरिल भोंगे , हनुमान चालीसा अशा अत...